शेतकरी आणि भूमीपुत्रांचे घरांचा योग्य मोबदला मिळावा यासाठी धरणे आंदोलन

शेतकरी आणि भूमीपुत्रांचे घरांचा योग्य मोबदला मिळावा यासाठी ठाणे येथे शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. ठाणे आणि भिवंडी शहराच्या ग्रामीण भागातून बुलेट ट्रेन प्रकल्प जात असल्याने बुलेट ट्रेन च्या मार्गामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या घरांना ज्याप्रमाणे मोबदला सांगितला तो न देता आता कमी प्रमाणात मोबदला देण्यात येत असल्याने काल पासून शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading