शिक्षा आणि स्वदेशी समर्थ भारतचा पाया- राजन चौधरी

देशाला स्वातंत्र्य मिळाले आता आपल्याला देश समर्थ बनवायचा आहे त्यासाठी शिक्षण आणि स्वदेशी यांचा भक्कम पाया रचला पाहिजे त्यातूनच भारत समर्थ म्हणून असे प्रतिपादन जीएसटी ठाण्याचे आयुक्त राजन चौधरी यांनी केले. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिना निमित्त सिग्नल शाळेत जीएसटी ठाणे विभागतर्फे आयोजित खादी पिशवी वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते
जीएसटी मंत्रालय देशाच्या उभारणीसाठी करसंकलन करते. त्या करसंकलनातून आधुनिक भारताची उभारणी होत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वतंत्र भारताला समर्थ भारत बनवायचं असेल तर गांधीजींचे विचार आपल्याला अंगीकारावे लागतील. शिक्षा आणि स्वदेशी यावर गांधीजींचा भर होता हे विषय आपण गांभीर्याने हाताळले तर भविष्यातला समर्थ भारत नक्की उभा राहील असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला. यावेळी सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांना स्वदेशीचे प्रतीक म्हणून खादी पिशवीचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन अभ्यास करावा आणि आपले भवितव्य उज्वल करावे असा मोलाचा सल्ला राजन चौधरी यांनी दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading