शालांत परीक्षेत जिल्ह्यातून ९३.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

शालांत परीक्षा म्हणजे दहावीचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये जिल्ह्यात 93.63% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत शालांत परीक्षेचा निकालात तीन टक्क्याने घट झाली आहे. जिल्ह्यातून १ लाख ११ हजार १८२ विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ४ हजार १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नेहमीप्रमाणे यंदाही निकालामध्ये उत्तीर्ण होणा-यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. शालांत परीक्षेस ५७ हजार ३३९ मुलं बसली होती. त्यापैकी ५२ हजार ७४३ मुलं उत्तीर्ण झाली. तर ५३ हजार ८४३ मुलींनी ही परीक्षा दिली. त्यापैकी ५१ हजार ३५९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण होणा-यांमध्ये मुलींची टक्केवारी ही ९१.९८ टक्के आहे. तर मुलांची टक्केवारी ही ९५.३८ टक्के आहे. शालांत परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता होती. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी संगणकाकडे धाव घेऊन आपला निकाल काय लागला आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. अनेक शाळांमधूनही विद्यार्थी निकालासाठी जमले होते. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदावर फुलांची उधळण केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading