शहरातील ८० टक्के सिसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा धक्कादायक आरोप करीत भाजप महिला आघाडीने ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालया समोरच आंदोलन केले. ठाणे शहरात महिला सुरिक्षत नाहीत, तीन हात नाका येथील घटना त्याचेच प्रतीक आहे, त्यामुळे सीसीटिव्ही नसल्याने या घटना होत असल्याचे महिला अध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी सांगितले. ठाण्यातील सीसीटिव्ही ची देखभाल करणारी कंपनी काम करत नाही, त्यांचे कंत्राट ४ महिने आधीच संपुष्टात आले असून, नवीन कंत्राट देखील देण्यात आलेले नाही. त्यामुळे ८० टक्के सीसीटिव्ही सध्या बंद आहेत. ते लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. परंतु सीसीटिव्ही सुरू झाले नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही भाजप महिला आघाडीने सांगितले आहे. आंदोलनानंतर त्यांनी ठाणे पालिका आयुक्त विपिन शर्मा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात १४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु यातील तब्बल १ हजाराहून अधिक कॅमेरे बंद पडलेले आहेत. त्यामुळे हे कॅमेरे तत्काळ दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे कॅमेरे बसविण्यासाठी नगरसेवक निधीचा देखील वापर करण्यात आलेला आहे. परंतु सद्यस्थितीत शहरातील १ हजार कॅमेरे बंद असल्याची माहिती पालिकेच्या संबधींत विभागानेच दिली आहे. त्यामुळेच काही दिवसापूर्वी रिक्षात बसलेल्या तरुणीच्या हातातील मोबाइल हिसकावून पळणाऱ्यांचे चित्रण बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे होऊ शकलेले नाही. परंतु या घटनेत त्या तरुणीचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. ज्या ठेकेदाराला या कामाचा ठेका देण्यात आला होता. तो संपुष्टात आलेला आहे, त्यामुळे निगा देखभाल होत नाही, ह्या कॅमे-यांची क्वालिटी अतिशय निकृष्ठ दर्जाची आहे, त्यामुळे पोलिसाना फूटेज मिळतच नाहि अशी पोलिसांकडून माहिती मिळाली आहे, त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होत असून हे कॅमेरे सुरु झाले नाहीत,तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण होणार आहे. त्यामुळे भविष्यात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काही अनुचित प्रकार घडले तर त्याची जबाबदारी पालिका घेणार का? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.