वीजेचा झटका बसून मुलाचा दुर्दैवी मृत्यू

आज झालेल्या जोरदार पावसात एका मुलाला वीजेचा झटका बसून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रकीब मंडल या अवघ्या १५ वर्षाच्या मुलाचा वीजेचा झटका बसून दुर्दैवी मृत्यू झाला. रकीब हा घोडबंदर येथील विवेक सेठ चाळीत राहत होता. ओवळ्यातील हनुमान मंदिराजवळ ही चाळ असून काल रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे या परिसरात जवळपास २ ते ३ फूट पाणी साचलं होतं. या परिसरात विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळं त्यातून वीजेचा प्रवाह पाण्यात शिरला होता. हे लक्षात न आल्यामुळं वीजेचा झटका बसून रकीबचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading