वाहतुक सुरळीत करण्याकरीता भंगार गाड्यांवर कारवाही करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्याकरिता रस्त्याच्या कडेला भंगार अवस्थेतील गाड्या नजरेस पडल्या तर त्या तात्काळ उचलण्याची कारवाई करावी असे निर्देश् महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. मुलुंड चेकनाका, श्रीनगर रस्त्यांवरील भंगार गाड्या उचलण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून येथील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. श्रीनगर पोलीस चौकी येथील रस्त्यांवर अनेक महिन्यांपासून भंगार अवस्थेतील चारचाकी आणि दुचाकी गाड्या उभ्या केलेल्या असल्याच्या तक्रारी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या गाड्यामुळे परिसरातील वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता तसेच नागरिकांना देखील येथून जाणे आणि परिसराची स्वच्छता करणे त्रासाचे होत होते. यात 4 चार चाकी गाड्या आणि 10 दुचाकी उचलल्यामुळे या ठिकाणच्या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या शौचालयांची नव्याने पुर्नबांधणी केली जाणार असून श्रीनगर पोलीस चौकी परिसरही सुशोभित केला जाणार असल्याचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी नमूद केले. भंगार अवस्थेतील कारवाई करण्यात आलेली वाहने बाटा कंपाऊंड येथे जमा करण्यात आली आहेत. यापुढे शहरात कुठेही भंगार अवस्थेतील गाड्या रस्त्यांच्या दुतर्फा अनेक दिवसांपासून उभ्या असतील त्या तातडीने हटवाव्यात अशा सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत. तसेच नागरिकांनीही याबाबत काही तक्रारी असतील तर आपत्कालीन विभागाशी 8657887101 / 8657887102 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading