उल्हासनगर आणि भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्रातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उल्हासनगर महापालिकेत आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी धारावी पॅटर्नच्या धर्तीवर मिशन झिरो अंतर्गत टेस्टींग वाढवणं, कोरोनाच्या संदर्भात जनजागृती करणं, होम क्वारंटाईन असलेल्या रूग्णांशी सतत संवाद साधून दर तीन तासांनी त्याचा अहवाल सादर करणं, डॉक्टर, परिचारिका तसंच आरोग्य सेवकांचं मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करणं, कोविड रुग्णालयात रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात याकरिता आयुक्त तसेच वरिष्ठ अधिका-यांना निर्देश देण्यात आले.