वागळे इस्टेट येथील औघोगीक वसाहतिला योग्य तो पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी ठाणे लघु उद्योग संघटनेचे म्हणजे टीसाचे अध्यक्ष मधु खांबेटे यांनी मुख्यमंत्रयांकडे एका पत्राद्वारे केली आहे. वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट ही औद्योगिक वसाहत एमआयडीसी ची पहिली औद्योगिक वसाहत असून येथे एमआयडीसी च्या बारवी धरणातून पाणी पुरवठा होतो गेली अनेक वर्षे पाण्याचा मोठया प्रमाणात तुटवडा असून आतातर येथील प्लॉट धारकांना गेली 15 ते 20 दिवस काही ठिकाणी गातील25 दिवस वापरायला सोडा पीण्यासाठी देखील पाणी मिळत नाही. वागळे इस्टेट बारवी धरणापासून शेवटचे टोक असल्यामुळे आणि येथील भौगोलिक स्थिती वेगळी असल्याने मुळातच येथे पाणीपुरवठयाची सम आणि विषम परिस्थिती आहे त्यातच एमआयडीसी चे पाणी चार महानगर पालिका बूस्टर पम्पाद्वारे जास्तीत जास्त उचलतात आणी त्यामुळेच वागळे इस्टेट मध्ये पाणी पोचतच नाही. आणि वागळे इस्टेट मध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी एमआयडीसी लक्ष देत नाही. एमआयडीसी ने काही वर्षांपूर्वी वागळे इस्टेट ला माहिती तंत्रज्ञान पार्क जाहीर केले आज जवळ जवळ 57 पार्क आहेत अधिक अस्तिवात असलेल्या स्थानिक कंपन्या ज्यांच्याकडे अर्धा इंच ते एक इंच जोडणी याआहे त्या सर्व प्लॉट धारकांना टँकर शिवाय पर्याय नाही आणि ते सुद्धा मिळणे अनेकवेळा दुरापास्त होते. ह्या विषयी एमआयडीसी ला, उद्योग मंत्री , मुख्य कार्यकारी अधिकारी ,स्थानीक अभियंता यांना पत्राद्वारे SMS द्वारे तसेच ट्विटर च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यां पासून पंतप्रधान कार्यालया पर्यंत कळवळूनही परिस्थिती जैसे थे च आहे. वागळे औद्योगिक वसाहती मधील प्लॉट धारकांना नियमित पाणी पुरवठा मिळेल ह्याची सोय करून द्यावी अशी टीसाची अपेक्षा असून पाण्या अभावी उद्योग बंद पडल्यास बेकारी वाढेल अशी भिती टिसानं मुखमंत्रयांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.