वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्राणीमित्र वॉर संस्थेची विशेष मोहीम

माणसांची जनगणना होते त्याचप्रमाणे प्राण्यांची देखील जनगणना होणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस प्राणी पक्षी आणि त्यांच्या अनेक जाती नष्ट होत चालल्या आहेत पण आजही अशा अनेक संस्था आहेत ज्या पशु पक्ष्यांसाठी झटत असतात. कल्याणमधील वॉर ही त्यातीलच एक संस्था आहे. या संस्थेचे सदस्य कल्याण नजिक असलेल्या जंगलात रवाना झाले आहेत. जंगलात जाऊन ठिकठिकाणी या टीम विशिष्ट कॅमेरे लावणार आहेत. बहुतांश वेळी जंगलातील पाणवठ्यावर प्राणी पाणी पिण्यासाठी येत असतात. या ठिकाणीही हे कॅमेरे लावण्यात येणार असून दरवर्षी ही जनगणना होते. कल्याण वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम या संस्थेमार्फत राबवली जात आहे. या मोहिमेतुन समोर आलेल्या अहवालाचा आधार घेत अनेक गोष्टींचे नियोजन आणि अभ्यास केला जातो.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading