लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं तर शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे नुसते राजकीय नेते नव्हते तर खगोलशास्त्र आणि पंचांगातही त्यांना गती होती. पंचांगात ज्याप्रमाणे दिलं आहे तसं प्रत्यक्ष आकाशात दिसलं पाहिजे आणि जसं आकाशात दिसतं तसं पंचांगात दिलं गेलं पाहिजे असं लोकमान्य टिळकांना वाटत होतं. आपली पंचांगं ही दृक गणितावरच आधारीत असायला हवीत यासाठी लोकमान्य टिळकांनी अथक प्रयत्न केले आणि त्यांच्या या प्रयत्नांना १९२० मध्ये यश आलं आणि भारतातील अनेक पंचांगकर्त्यांनी दृक गणिताचा स्वीकार केला. याचं सर्व श्रेय लोकमान्यांना जातं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading