राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 3 हजार छत्र्यांचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खोपट येथील हंस नगर परिसरात सुमारे 3 हजार छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या छत्रीावटप कार्यक्रमास शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे-पालघर विभागिय महिलाध्यक्षा ॠता आव्हाड उपस्थित होत्या. राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस हेमंत वाणी आणि सामाजिक कार्यकर्त्या सीमा वाणी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सुमारे 3 हजार नागरिकांना मोफत छत्री देण्यात आली. देशात सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. अशा स्थितीमध्ये नागरिकांना छत्री घ्यावी की पोट भरावे, असा प्रश्न पडला आहे. याच काळात हेमंत वाणी यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना मोफत छत्र्या देऊन एक चांगला उपक्रम राबविला आहे, असे मत यावेळी ॠता आव्हाड यांनी केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading