राज्यातील 606 शेतकऱ्यांचे काजू चे डबे, 58 लाखांची रोकड असा सव्वादोन कोटींचा ऐवज ठाणे पोलिसांमुळे शेतकऱ्यांना मिळाला परत

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक क्रमांक एक न राज्यातील 606 शेतकऱ्यांचे काजू चे डब्बे त्यांना परत मिळवून दिले असून करोडो रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसा दिवसात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करून परस्पर विक्री करुन फरार झालेल्या प्रकरणाच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या, अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या कोल्हापूरच्या शौकात अली मुजावर यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीचा तपास गुन्हे शाखा घटक क्रमांक एक न केला आणि फरार झालेल्या ठाण्यातील अष्टविनायक ट्रेडिंग मिलचे दीपक पटेल, सुचित कुमार असरानी यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात या दोघांचा कोणताही ठावठिकाणा नसतानाही पोलिसांनी तपास करुन या दोघांना जेरबंद केलं, ठाण्यातील गुन्ह्यातील एक कोटी 49 लाखांचे 1109 काजूगराचे डबे तसेच कोल्हापूर आणि कर्नाटक मधील शेतकऱ्यांचे 2234 काजूगराचे डबे, 58 लाखांची रोकड सव्वादोन कोटींचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील 192 शेतकरी आणि बेळगाव जिल्ह्यातील 414 शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं मोठ्या आर्थिक नुकसान नुकसानीतून बचाव केला आहे.या सगळ्या शेतकऱ्यांना आयुक्त विवेक फणसाळकर यांनी मोठ्या समारंभ पूर्वक माल परत केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading