मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी जनगौरव सोहळा आता 30 जुलैऐवजी 13 ऑगस्टला होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी जनगौरव सोहळा आता 30 जुलैऐवजी 13 ऑगस्टला होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यवेळापत्रकातील अपरिहार्य बदलामुळे जनगौरव सोहळ्याच्या नियोजित तारखेत बदल करावा लागल्याची माहिती मुख्यमंत्री जनगौरव समितीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन मुख्यमंत्री जनगौरव समितीने केले आहे. या आयोजन समितीत ठाण्यातील कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी क्षेत्रांतील संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जनगौरव सोहळा 30 जुलै करण्याचे योजले होते. परंतु मुख्यमंत्र्यांच्या कार्यवेळापत्रकात अचानक अपरिहार्य बदल झाल्याने या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोहळ्यास उपस्थित राहणे शक्य झाले नसते. यामुळे आता हा जनगौरव सोहळा शनिवार, 13 ऑगस्ट रोजी होणार आहे. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात होणाऱ्या या जनगौरव सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या नागरी सत्काराबरोबर त्यांच्यावरील गौरवगीताचे सादरीकरण, गौरवग्रंथाचे प्रकाशन आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचेही आयोजन करण्यात आले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading