मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील शहीद जवानांना ठाण्यात श्रध्दांजली

मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील शहीद जवानांना ठाण्यात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. २६ नोव्हेंबर २०११ ला दहशतवाद्यांनी मुंबईवर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये शेकडो निरपराध नागरिक मारले गेले. त्याचबरोबर दहशतवाद्यांशी लढताना पोलीस तसंच सैन्यदलाचे जवानही शहीद झाले. या जवानांना सिध्देश्वर तलावाजवळील शहीद उद्यानात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसंच मानवंदना देण्यात आली. महापौर नरेश म्हस्के यांनी ही श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रमुख, नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading