ठाणे महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव सणांच्या पार्श्वभूमीवर मासुंदा तलाव येथील दत्त घाटामधील पाण्याची गुणवत्ता सुधारण्याकरिता पाण्याचा पूर्णपणे उपसा करून गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याने विसर्जन घाट काही दिवस बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी या कालावधीत निर्माल्य अथवा इतर धार्मिक साहित्य, मुर्तीचे विसर्जन करु नये असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मासुंदा तलावाच्या ठिकाणी निर्माल्य विसर्जनाकरिता विसर्जन घाटाची निर्मिती करण्यात आली आहे. मूळ तलावातील पाण्याचे प्रदूषण रोखण्याकरिता आणि नागरिकांच्या धार्मिक भावन राखून पाण्यामध्ये निर्माल्य विसर्जनाकरिता सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता या घाटाची निर्मिती करण्यात आली आहे. या घाटावर ठाणेकर नागरिकांद्वारे दररोज मोठ्या प्रमाणात निर्माल्य विसर्जित करण्यात येत असते. गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव कालावधीतदेखील या विसर्जन घाटावर लहान मूर्तीचे विसर्जनकरीता महापालिकेद्वारे विशेष विसर्जन व्यवस्था करण्यात येत असते. दत्त घाटामधील पाण्याची गुणवत्ता सुधारण्याकरिता पाण्याचा पूर्णपणे उपसा करून गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असून पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे तलावातील पाण्याची पातळी राखता येणार आहे. तरी नागरिकांनी या कालावधीत निर्माल्य अथवा इतर धार्मिक साहित्य, मुर्तीचे विसर्जन करु नये असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.