मासुंदा तलावातील तरंगत्या रंगमंचावर विठ्ठलनामाच्या सूरांनी ठाणेकर मंत्रमुग्ध झाले होते.खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या अॅम्पी थिएटरचं लोकार्पण झालं त्यावेळी सुप्रसिध्द गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, पं. संजीव अभ्यंकर, आनंद भाटे आणि मंजुषा कुलकर्णी-पाटील यांच्या स्वरांनी ठाणेकर मंत्रमुग्ध झाले. संपूर्ण अॅम्पी थिएटर तुडुंब भरले होते. या कार्यक्रमाची पावसाच्या हजेरीने सांगता झाली.