मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बील भरल्यास व्याजात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. पाणी बीलाची चालू रक्कम थकीत पाणी बीलाच्या रक्कमेसह फेब्रुवारी अखेरपर्यंत भरल्यास दंड आणि व्याजाच्या रक्कमेमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. ज्या नळ संयोजन धारकांनी अद्याप पर्यंत पाणी बीलाचा भरणा केलेला नाही अशांचं नळ संयोजन खंडीत केलं जाणार आहे. जे नळ संयोजन धारक देय असलेली पाणी बीलाची रक्कम थकीत रक्कमेसह २९ फेब्रुवारी पर्यंत एकरकमी भरतील अशांना व्याजात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. जे ३१ मार्च पर्यंत भरतील अशांना ४० टक्के सवलत दिली जाणार आहे असं महापालिकेनं कळवलं आहे.