महायुतीला ठाण्यासाठी उमेदवार मिळत नसेल तर आपल्याला बिनविरोध निवडून द्या असा टोला राजन विचारे यांनी आज नाव न घेता लगावला. कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली यातूनच महायुतीमध्ये काय सुरू आहे ते समजून घ्यावे असं विचारे यांनी म्हटलं आहे. आमची प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली आहे. ठाण्यासाठी उमेदवार मिळत नसेल तर आपल्याला बिनविरोध निवडून द्यावं असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. आज राजन विचारे आणि वैशाली दरेकर यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांची भेट घेतली. प्रचाराचं पुढील नियोजन कसं करायचं यावर बैठक झाल्याचं राजन विचारे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.