महापालिका आयुक्तांनी गेल्या १० दिवसात पावसामुळं उद्भवलेल्या परिस्थितीचा घेतला आढावा

महापालिका आयुक्तांनी गेल्या १० दिवसात पावसामुळं उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलं होतं त्याची कारणं आणि त्यावर केलेली उपाययोजना याबाबत पालिका आयुक्तांनी अहवाल मागवला आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलं होतं त्या सर्व ठिकाणांची तपशीलवार चर्चा केली जाणार आहे. नालेसफाईच्या कामाबाबत बोलताना त्यांनी झालेल्या कामांचा छायाचित्रासह अहवाल सादर करण्याचे आदेश घनकचरा विभागाला दिले. तर प्रभाग समिती स्तरावर फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईचा अहवालही सादर करण्याचे आदेश त्यांनी अतिक्रमण विभागाला दिले. पावसाळा सुरू असला तरी पाणीपट्टी आणि मालमत्ता कर वसुलीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं सांगून त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत असं सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading