जिल्ह्यातील अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांनी केलं आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणतीही शाळा संबंधित शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय सुरू करता येत नाही. जिल्ह्यामध्ये २० शाळा अनधिकृत असून या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. आरकॉम ईस्लामिक स्कूल, रफीक इंग्लिश हायस्कूल, स्टार इंग्लिश हायस्कूल, आदर्श विद्यालय, नालंदा हिंदी विद्यालय, होली मारिया कॉन्व्हेंट हायस्कूल, आत्मन ॲकॅडमी आणि अरूणज्योत विद्यालय या ठाण्यातील शाळा अनधिकृत असून यामध्ये प्रवेश न घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.