ठाण्यामध्ये मलनिस्सारण टाकी साफ करताना मरण पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना येत्या २६ जानेवारी रोजी प्रत्येकी १० लाखांची नुकसान भरपाई जिल्हाधिका-यांच्या हस्ते दिली जाणार आहे. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सचिव नारायणदास यांनी ही माहिती दिली. काल महापालिका अधिकारी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ९ मे २०१९ मध्ये मलनिस्सारण टाकी साफ करताना काही कामगारांचा मृत्यू झाला होता. ही टाकी साफ करताना वाचलेल्या ५ सफाई कामगारांचं पुनर्वसन करावं अशी मागणी श्रमिक जनता संघाच्या जगदिश खैरालिया यांनी केली होती. सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देताना जातीचा दाखला देण्याची अट रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचं आश्वासन अशोक बुरपुल्ले यांनी या बैठकीत दिलं.