मनसेने लगावलेल्या कानाखालीमुळेचे महाराष्ट्रात मराठी टिकली – शर्मिला ठाकरे

महाराष्ट्रात मराठी भाषा बोलण्यासाठी काही जणांना लाज वाटत होती, तर काही जणांनी ही सक्ती वाट होती, मात्र 15 वर्षा पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लगावलेल्या कानाखालीमुळेच राज्यात मराठी टिकली असल्याचे वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केला आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त शर्मिला ठाकरे ठाण्यात आल्या होत्या. गडकरी रंगायतन येथे गौरव महिलांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी हे विधान केले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. राजकारणात महिलांनी आपले स्थान चांगले निर्माण केले असून महाराष्ट्रात जागतिक कीर्तीचे रत्न तयार झाले असल्याचे यावेळी शर्मिला ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी आपण मराठीच बोलले पाहिजे, आपण मराठी मध्ये सवांद साधला तरच समोरची व्यक्ती मराठीत बोलू शकेल त्यामुळे प्रत्येकाने आपले मराठीपण जपले पाहिजे असल्याचे यावेळी ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान मराठी भाषेसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अनेकवेळा खळखट्याक आंदोलने केल्यानंतर विविध ठिकाणी मराठी भाषेच्या पाट्या, मराठी भाषेचा वापर होऊ लागला हे फक्त मनसेच्या कार्यकर्त्यांकडून शक्य झाले आहे. 15 वर्षापूर्वी मनसेने लगावलेल्या कानाखालीमुळेच हे शक्य झाले असल्याचे यावेळी शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.
मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाला देखील त्यांनी हजेरी लावून स्वतः मराठीत स्वाक्षरी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading