मध्य रेल्वेच्या दोन लाईनमन्स मुळे आज मोठा अपघात टळला. मिथुनकुमार आणि हिरालाल हे दोघे आज सकाळी ६ च्या सुमारास रेल्वे मार्गामध्ये दैनंदिन तपासणी करत होते. त्यावेळी मिथुनकुमारला रेल्वे मार्गाला तडा गेला असल्याचं लक्षात आलं. त्याने हिरालालला सतर्क केलं. या दोघांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांना याची कल्पना दिली आणि धोका टाळण्याचे प्रयत्न केले. सकाळच्या वेळी मुंबईहून पुण्याला जाणारी इंद्रायणी एक्सप्रेस आपल्या वेळेनुसार धावत होती. त्यांनी इंद्रायणी एक्सप्रेसला आधीच थांबवले आणि पुढील गंभीर प्रसंग टळला. लाईनमन्सच्या या सतर्कतेची रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांनी दखल घेतली असून दोघांचाही सन्मान केला जाणार आहे. या प्रकारामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने धावत होती.