बुधवारी ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा काही भागात बंद राहणार

ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला वेळोवेळी पूर आला असून पुराच्या पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ आणि कचरा जमा झालेला आहे. पाण्यासोबत आलेला गाळ आणि कचरा पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने सदरच्या पंपाचा फ्लो कमी झाला आहे. तसेच इंदिरानगर संप येथे पाण्याची गळती झाल्याने सदरची गळती काढणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने बुधवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येत असून या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. बुधवार दिनांक २४ ऑगस्ट, रोजी सकाळी ९ ते रात्री ९  वाजेपर्यंत इंदिरानगर पंप हाऊसवरील इंदिरानगर, रामनगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, रुपादेवी, विठ्ठल क्रिडा मंडळ, किसननगर इद्यादी भागात पाणी पुरवठा बंद राहील तसेच उर्वरित भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.  शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पुर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading