कल्याण पश्चिमेतील बारावे येथील कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा प्रकल्पातील कचराभूमीला दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली असून कडक उन, जोरदार वारे यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराच्या लोटांनी रहिवासी हैराण झाले असून आगे वरती नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवरती नियंत्रण आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. आधारवाडी, बारावे येथील कचरा भूमीला आग लागण्याची गेल्या दोन महिन्यांतील ही पाचवी ते सहावी घटना आहे.