महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक म्हणजे बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ठाण्याचा निकाल 89.86 टक्के लागला आहे. बारावीच्या परीक्षेत ठाणे विभागातून 91 हजार 39 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 81 हजार 805 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावी उत्तीर्ण होणाऱ्या मध्ये मुलींची संख्या अधिक आहे बारावीला एकूण 47 हजार 995 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 41 हजार 778 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या परीक्षेत 43 हजार 44 विद्यार्थिनीबसल्या होत्या त्यापैकी 40 हजार 27 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.उत्तीर्ण होणाऱ्या मध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण 87.05 टक्के तर विद्यार्थिनींचे प्रमाण 92.99 टक्के आहे.बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या प्रमाण अधिक आहे.विज्ञान शाखेतून 26 हजार 501 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी 25 हजार 340 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी मध्ये हे प्रमाण 95.62 टक्के आहे. कला शाखेतून 14 हजार 694 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 11 हजार 716 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी मध्ये हे प्रमाण 79.73 टक्के आहे. वाणिज्य शाखेतून 48 हजार 883 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली त्यापैकी 43 हजार 876 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. टक्केवारी मध्ये हे प्रमाण 89.76 टक्के आहे.