प्रत्येक सरपंचाने आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःच पुढाकार घेवून गावे स्वच्छ ठेवावीत – कपिल पाटील

स्वच्छता ही सेवा या अभियान अंतर्गत प्रत्येक सरपंचाने आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःच पुढाकार घेवून गावे स्वच्छ ठेवावीत, असे आवाहन केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील यांनी केले. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान जिल्हयात स्वच्छता ही सेवा अभियान ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून, अंजूर ग्रामपंचायतीमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. स्वच्छतेच्या कामात महिलांनी जास्तीत जास्त सक्रिय सहभाग नोंदवून, आपली गावे अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन रूपाली सातपुते यांनी केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading