ब-याच दिवसांच्या खंडानंतर पावसानं आज अचानक हजेरी लावल्यामुळे अनेकांची त्रेधा तिरपीट उडाली. गेले काही दिवस पाऊस गायब होता. त्यामुळे वातावरणात उष्माही वाढला होता. आज सकाळी काही काळ ढगाळ वातावरण होतं. त्यामुळं पावसाची शक्यता दिसत होती. दुपारनंतर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. सकाळच्या सुमारास पावसाचं वातावरण नव्हतं. त्यामुळं घराबाहेर पडलेल्या अनेकांना दुपारच्या अवचित आलेल्या पावसानं भिजवून टाकलं. काही भागातील जोरदार पावसामुळे तर अनेकांची चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली.