ठाणे महापालिकेच्या वतीने 2020-21 या आर्थिक वर्षातील पाणी देयकांची तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता मोठया प्रमाणावर मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नळ संयोजन खंडीत करुन, पाणीपुरवठा बंद करणे, जप्तीची कारवाई करणे, पंप रुम सिल करणे, पंप जप्तीची कारवाई करणे तसेच मोठ्या थकबाकीदारांची नांवे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे अशा प्रकारची मोहिम हाती घेण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसांत थकबाकीदारांच्या 350 नळजोडण्या खंडीत करुन पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी त्यांची पाणी बिलांची देयके तातडीने भरून महापालिकेस सहकार्य करावे आणि होणारी कारवाई टाळावी असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.