दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होऊ नये असे आदेश देताना दिवाळी पर्यावरण पूरक साजरी करण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे. पालिका आयुक्तांनी एका बैठकीत हे आदेश दिले. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असली तरी संपलेली नाही त्यामुळं गाफील राहून चालणार नाही. दिवाळीची सुट्टी असली तरीही मुलभूत सुविधांच्या बाबतीत नागरिकांची हेळसांड होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले. विशेषत: पाणी पुरवठा, साफसफाई बाबत संबंधित विभागानं विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याचप्रमाणे ही दिवाळी ठाणेकरांनी फटाके न वाजवता पर्यावरण पूरक साजरी करावी असं आवाहनही पालिका आयुक्तांनी केलं.