नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीसांनी मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या वाहन चालकांच्या विरोधात विशेष मोहिम चालवली असून विविध ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. नाकाबंदीच्या पहिल्या चार दिवसात म्हणजे २५ डिसेंबरपासून आजपर्यंत ४१५ मद्यपि वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. उद्याच्या ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आज ही कारवाई अधिक कडक केली जाणार आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर अशा विविध ठिकाणी महत्वाच्या नाक्यांवर तपासणी नाके उभारून वाहन चालकांची तपासणी केली जाणार आहे. ठाण्यामध्ये मासुंदा तलाव, उपवन आणि विशेषत: येऊर परिसरात नववर्ष साजरे करणा-यांची झुंबड उडत असते. यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व ठिकाणी २५ डिसेंबर पासून वाहन चालकांची तपासणी केली जात आहे. येऊरला जाणा-या प्रत्येक वाहनाची सध्या पोलीस तपासणी करत असून दोषी आढळणा-यांवर कारवाई होत आहे.