धोकादायक इमारती मधून राहणाऱ्या रहिवाशांची घरे खालि करताना त्यांना हमीपत्र देण्याची मतदाता जागरण अभियानाची मागणी

धोकादायक इमारती मधून राहणाऱ्या रहिवाशांना त्यांचे घर खाली करताना त्यांचा घराचा अधिकार कायम राहील याची हमी देणारे पत्र द्यावं अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियाना केली आहे. ठाण्यामध्ये साधारणता अकराशेहून अधिक दोकादायक इमारती खाली करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. या घरांचे पाणी आणि वीज फोडण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. समूह विकास योजनेमध्ये मालकी हक्काचे घर देण्याचा कोणताही आदेश नसताना पालकमंत्री आणि महापालिका रहिवाशांची दिशाभूल का करत आहेत असा सवालही अभियानाने उपस्थित केला आहे. धोकादायक इमारती मधून राहणाऱ्या रहिवाशांनी आपली जागा आम्ही पत्र मिळालेकीच घर खाली करावी अस आवाहन अभियानाने केल आहे. समूह विकास योजनेमध्ये सर्वांना मालकी हक्काचे घर मिळेल असे फलक किसन नगर भागात पालकमंत्र्यांच्या नावाने लावण्यात आले आहेत. ज्यावर पालिकेचा लोगो आणि नावही आहे. पण समुहविकास योजनेच्या परिपत्रकात मात्र रहिवाशांनाच मालकी हक्काचे घर मिळणार आणि अपात्र रहिवाशांना भाड्याच्या घरात राहावे लागणार असे स्पष्ट करण्यात आलं आहे. या परिपत्रकातील कोणतेही निकष न बदलता रहिवाशांची दिशाभूल का केली जात आहे असा प्रश्नही अभियानाने उपस्थित केला आहे. ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे येत्या शनिवारी महापालिकेसमोर यासाठी निदर्शने केली जाणार असल्याचे अभियानाचे अध्यक्ष संजीव साने यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading