धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील समाधानकारक पावसामुळे पाणी टंचाईची टांगती तलवार दूर

गेल्या काही दिवसात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळं पाणी टंचाईची टांगती तलवार दूर झाल्यात जमा आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला भातसा आणि बारवी धरणातून पाणी पुरवठा होतो. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळं धरणांतील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. भातसा धरणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ही ९४२ दशलक्ष घनमीटर आहे. तर आजघडीला ७४० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळं धरणामध्ये सध्या ७९ टक्के पाण्याचा साठा आहे. आत्तापर्यंत या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १६९१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही ३३८ दशलक्ष घनमीटर आहे तर धरणामध्ये आजघडीला २६३ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. म्हणजे धरणामध्ये ७८ टक्के पाणीसाठा आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आत्तापर्यंत १६२५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील समाधानकारक पाणीसाठ्यामुळं पाणी टंचाईची टांगती तलवार दूर झाल्यात जमा आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading