राष्ट्रीय लोकन्यायालयात जिल्ह्यामध्ये २१८ प्रकरणात नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. काल झालेल्या या राष्ट्रीय लोकन्यायालयात एकाच प्रकरणात ९५ लाखांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. ठाणे जिल्हा न्यायालयातील लोकन्यायालयात एकूण २१८ प्रकरणं निकाली निघाली. यामध्ये १२ कोटी ४० लाख ९३ हजारांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. सध्या कोरोना असल्यामुळं ऑनलाईन पध्दतीनं २१८ प्रकरणांपैकी १७४ प्रकरणांमध्ये तडजोड यशस्वी झाली.