दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढणार

दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली. राज्यात कोरोना परिस्थितीमुळे काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे राज्यातील दुकाने दुपारी 4 पर्यंतच चालू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली दौऱ्यात असताना राज्यातील दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास सांगितले आहे. सांगलीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. पण, या निर्णयाची अंमलबजावणी केव्हापासून होईल, याबाबत सरकारकडून माहिती देण्यात आलेली नाही. राज्यातील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तिथेच ही परवानगी असेल. कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. या संदर्भातील जीआर आज निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading