देवदिवाळीमध्ये आपण दिवाळी संध्या कार्यक्रमाचं आयोजन करू असा शब्द पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमध्ये बोलताना उपस्थितांना दिला. कल्याणमध्ये कपिल पाटील यांच्यातर्फे काल दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सुप्रसिध्द गायिका वैशाली सामंत यांनी आपल्याला संध्याकाळची गाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमात गावी लागत असल्याची खंत व्यक्त केली होती. त्याला धरून कपिल पाटील यांनी लवकरच आपण दिवाळी संध्या कार्यक्रमाचं आयोजन करू अशी घोषणा केली. त्याला उपस्थितांनी कडाडून दाद दिली.