घोडबंदर रोडवर दुचाकी घसरल्याने ठाणे महापालिकेच्या पाण्याच्या टँकरखाली सापडुन आरुष जाधव हा ५ वर्षीय चिमुकला ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली. भिवंडीतील कशेळी येथे राहणारा आरुष आपल्या आई-वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना ब्रम्हांड सिग्नलजवळ दुचाकी घसरल्यामुळे नियंत्रण सुटुन तिघेही खाली पडले. तर बाजुने जाणाऱ्या ठाणे महापालिकेच्या टॅंकरच्या मागील चाकाखाली सापडुन आरुष जागीच ठार झाला. तर त्याची आई दर्शना आणि राजेश दोघेही किरकोळ जखमी झाले. चितळसर-मानपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.