दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरून विनाकारण फिरणा-यांवर कारवाई करून ठाणे पोलीसांनी केला ६१ लाखांचा दंड वसूल

लॉकडाउनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा सोडून विनाकारण २ व्हीलर आणि ४ व्हिलर घेऊन फिरणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करून ६१ लाखाहून अधिक दंड ठाणे पोलीसांनी वसूल केला आहे. संचारबंदी लागू असतानाही अनेकजण विनाकारण फिरताना आढळून येतात. अशा विनाकारण टू व्हीलर आणि फोर व्हीलर घेऊन फिरणा-यांवर पोलीस कारवाई करत असून आत्तापर्यंत ९ हजार ३०० वाहनं जप्त करून ६१ लाख ४१ हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयानं दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच थांबावे आणि ठाणे शहर पोलिसांना सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading