ज्ञान आणि आकलन शास्त्रशुध्द पध्दतीनं नवीन पिढीला व्हावं यासाठी दशावतार कार्यक्रमाचं आयोजन करणं गरजेचं आहे. दशावतार ही महाराष्ट्रातील जुनी लोककला असून या कलेचं जतन होणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन उपमहापौर पल्लवी कदम यांनी केलं. ठाण्यामध्ये दशावतार नाटक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या. दशावतार ही लोककला भविष्यात टिकून रहावी आणि या कलेची जोपासना व्हावी या हेतूनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शासनाकडून लोककला जपण्याचे प्रयत्न केले जात आहेत, नागरिकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन उपमहापौरांनी यावेळी केलं.