तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू तर पाच जखमी झाले. तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव जिल्ह्यात काल सकाळपासून जाणवू लागला होता. सर्वत्र सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस असे चित्र दिसत होते. चक्रीवादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ठाणे तालुक्यात एकाचा मृत्यू आणि चार जखमी झाले, मिरा-भाईंदर मध्ये एकाता मृत्यू झाला तर उल्हासनगरमध्ये एका मृत्यूची नोद झाली तर एकजण जखमी झाला आहे. तसेच भिवंडी तालुक्यात एक घर आणि अंबरनाथ तालुक्यात पाच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली आहे.