कल्याण, डोंबिवली शहरामध्ये तसेच आजूबाजूच्या परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी ९ संघटित गुन्हेगारी टोळ्यामधील २४ आरोपीच्या मुसक्या आवळत त्यांच्यावर मोक्का कायदा अतंर्गत कारवाई केली आहे.
डोंबिवली शहरात मध्ये तसेच इतर भागात कारवाई केलेले आणि अट्टल गुन्हेगार हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे लुटणे, बळजबरीने सोनसाखळी चोरणे, खंडणी मागणे असे गुन्हे करत होते. यामध्ये कुराडे यांनी ९ संघटित गुन्हेगारी टोळ्यामधील २४ आरोपीच्या मुसक्या आवळत त्यांच्यावर मोक्का कायदा अतंर्गत कारवाई केली गेली आहे. या कारवाई मध्ये टोळी प्रमुख रमेश उर्फ रामकिसन पालीवाल आणि त्याचे दोन साथीदार, तसेच टोळी प्रमुख तुषार उर्फ वांग्या -प्रकाश पवार आणि त्याचे दोन साथीदार, तसेच इराणी गँग मधील टोळी प्रमुख बाकर उर्फ बाबर अली , गुलामअली सय्यद आणि त्यांचे दोन साथीदार तसेच टोळी प्रमुख सुनील फुलोरे उर्फ सोन्या आणि याचा साथीदार. टोळी प्रमुख आशिष श्रीवास्तव आणि त्याचा एक साथीदार, चंद्रकांत जमादार उर्फ मोठा चंदया आणि सहा साथीदार अशा एकूण २४ आरोपींवर पोलिसांनी मोक्का कायदा अतंर्गत कारवाई केली आहे.
यामुळे आता डोंबिवली, कल्याण, उल्हानगर, अंबरनाथ शहरातील रस्त्यावर होत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी त्याचसोबत महिलांसोबत घडणाऱ्या सोनसाखळीच्या गुन्ह्यांना नक्कीच आळा बसेल तसेच अश्या कारवाया यापुढे देखील होत राहतील असे डोंबिवलीचे सहायक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी सांगितले.