बाबासाहेब को याद करो, गुटखा, अंमली पदार्थ, दारू से दूर चलो” “दारू छोडो निरोगी रहो”, “व्यसनमुक्त समाज- स्वस्थ समाज” आदी घोषणा देत रैली काढून ठाण्यात बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. व्यसनमुक्ती जनजागृती सेवा संस्था, समता विचार प्रसारक संस्था आयोजित रैलीची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. ठाण्यातील बाजारपेठेतून घोषणा देत ठाणे रेल्वे स्टेशन पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. ठाणे रेल्वे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमे जवळ मिरवणुकीचे समारोप करतांना सर्व उपस्थितांनी नशामुक्तीची चळवळ अधिक तीव्र करण्याचा संकल्प केला. महाराष्ट्र शासन आणि ठाणे महापालिका प्रशासनाने नशामुक्तीसाठी प्रबोधनाची चळवळ कामगार कर्मचाऱ्यांसह विविध लोकवस्त्यांमध्ये सुरू करावी, यासाठी स्थानिक पातळीवर विविध सामाजिक संस्थांना सहकार्य करावे, असे आवाहन जगदीश खैरालिया यांनी केले. जसे स्वच्छ ठाणे- सुंदर ठाणे आपण म्हणतो तसेच व्यसनमुक्त ठाणे या साठी देखील आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे ही खैरालिया यांनी सांगितले.