ठाण्यामध्ये आज सकाळीही पावसाने हजेरी लावली. आज सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान पावसानं शहरामध्ये जोरदार हजेरी लावली या पावसामुळे ठीकठीकाणी पाणी साचलं होत. कळव्यातील विटावा बायपासखालीही पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. सकाळच्या सुमारास ढगांचा जारदार गडगडाट आणि विजांच्या चमचमाटात पावसानं हजेरी लावली होती. यामुळे हवेत काही काळ गारवा निर्माण झाला होता. या पावसामुळे तब्बेतींच्या तक्रारीत वाढ निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे.