ठाण्यात १ जुलैच्या मध्यरात्रीपासून पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. २ ते ११ जुलै दरम्यान हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय महापालिका आणि पोलीसांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून याबाबत चर्चा सुरू होती अखेर आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून भाजी, मासळी बाजार तसंच किराणा दुकानंही बंद राहणार आहेत. तरी नागरिकांनी गर्दी न करता अत्यावश्यक गोष्टी आणून ठेवाव्यात असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.