ठाण्यात उष्णतेचा उच्चांक – दुपारी ४४.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद

ठाण्यामध्ये आज उष्णतेनं उच्चांक गाठला. वेधशाळेनं १६ मार्च पर्यंत उष्ण लहरींचा तडाखा बसण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार गेले काही दिवस तापमानात झालेली वाढ जाणवत होती. आज तर सकाळी १० वाजताच तापमानाचा पारा जवळपास ३८ अंशावर गेला होता. नंतर ११ ते १२ या तासाभरात तापमानाचा काटा ४१ अंशावर गेला. त्यानंतर १२ ते १ च्या दरम्यान तापमानाचा काटा ४३.४ अंशावर गेला होता. तर दुपारी १ ते २ या वेळात सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद झाली. या तासाभरात तापमानाचा काटा ४४.१ अंशावर गेला होता. दुपारी २ नंतर मात्र तापमानाचा काटा काहीसा घसरू लागला. या काळात तापमान ४४ अंश सेल्सियस होतं. वेधशाळेनं या काळात विशेष सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं होतं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading