ठाण्यातील एक प्रख्यात उद्योजक सुहास मेहता यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विवेक संवाद या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. अतिशय अल्प कालावधीमध्ये व्यवसायात मैलाचा दगड ठरल्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्या निर्माण होत असलेली वीज कालांतराने कमी पडणार असल्यानं सूर्यापासून मिळणा-या उर्जेच्या आधारेच या देशात उर्जा संवर्धन करण्यात आलं पाहिजे या विचारानं प्रेरीत झालेल्या सुहास मेहता यांनी १९८५ साली एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी रस्त्यावरील दिवाबत्तीची कामं केली असून त्यासाठी सौर उर्जेचा वापर केला आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना उद्योग विवेकच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात आला.