आज आठवड्याचा पहिला दिवस ठाण्यातील चाकरमाणी मुंबईच्या दिशेने कामावर जाण्यास निघाले आणि ठाण्याच्या तीन हात नाका ब्रिज ,आनंद नगर जकात नाका ते मुलुंड टोल नाक्यापर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या 2 तव 3 कोलो मीटर लांबच लांब रांगा टोल नाका आणि जड अवजड वाहनामुळे होत आहे. मुंबईच्या दिशेने जाताना मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाले आहे साकेत पुलाचे काम सुरू असताना दुसरीकडे वाहतूक विभागाकडून जड अवजड वाहनांसाठी नोटिफिकेशन काढण्यात आलं होतं.
रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत तसेच दुपारी 12 ते 4 पर्यंत मुभा देण्यात आली होती ,मात्र सर्रासपणे जड अवजड वाहन आता देखील दिसत आहे त्यामुळे चाकरमानी आणि रुग्णवाहिकांना देखील रुग्णांना घेऊन जाताना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.
You must be logged in to post a comment.