रक्षाबंधन 30 ऑगस्ट साजरा करायचं आहे – दा कृ सोमण

रक्षाबंधन सण बुधवार 30 ऑगस्टलाच दिवसभर साजरा करायचा आहे.

या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. जर मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तो भद्रा करण असताना केला जात नाही. त्या दिवशी सकाळी 10-58 ते रात्री 9-02 भद्रा करण आहे. महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल. भद्राकालात राखी बांधली तर वाईट होईल असा मॅसेज व्हायरल होत आहे त्यात काहीही तथ्य नाही असे पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितले. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा बुधवार 30 ऑगस्ट रोजीच असल्याचे त्यानी स्पष्ट केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading