ठाण्यातील खड्डे बुजवण्यास सत्ताधारी अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ संजय घाडीगावकर यांनी घातलं खड्ड्यांचे विधीवत श्राध्द

ठाण्यातील खड्डे बुजवण्यास सत्ताधारी अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ ठाणे फर्स्टच्या संजय घाडीगावकर यांनी तीन हात नाका येथे खड्ड्यांचे विधीवत श्राध्द घातले. दरवर्षी रस्ते दुरूस्तीच्या नावानं निधी खर्च केला जातो मग खड्डे कसे पडतात असा प्रश्न घाडीगावकर यांनी उपस्थित केला. ठाणेकरांचा पैसा खड्ड्यात घालणा-यांचा निषेध करण्यासाठी आणि ठाण्यातील खड्ड्यांना मुक्ती मिळावी म्हणून घाडीगावकर यांनी त्यांचे विधीवत श्राध्द घातले. ठाण्यातील जनता खड्डेमुक्त रस्त्याची मागणी करत असतानाही रस्ते खड्डेमुक्त होत नाहीत. भर पावसात खड्डे बुजवण्यासाठी निविदा काढल्या जातात. मुसळधार पाऊस पडल्यानं पुन्हा खड्डे होतात. मग पावसात खड्डे भरण्यापेक्षा ते पावसाआधी का भरले जात नाहीत असा प्रश्नही घाडीगावकर यांनी केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading