ठाण्यातील काही भागाचा पाणीपुरवठा बुधवारी १२ तास बंद

ठाण्यातील काही भागाचा पाणीपुरवठा बुधवारी १२ तास बंद राहणार आहे. महापालिकेच्या पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्र येथील एच.टी सबस्टेशन मधील तांत्रिक दुरुस्तीसाठी शहरातील विविध ठिकाणच्या जलवाहिनीची दुरूस्ती करण्यात येणार आहे. तसेच जयभवानीनगर स्मशानभूमीकडे जाणा-या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या अंतर्गत बाधित होणाऱ्या जलवाहिन्या आणि पंपिंग स्टेशनच्या उच्चदाबाचे पॅनल्स् स्थंलातरित करण्यात येणार असल्याने बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत १२ तास महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत महापालिकेला होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत इंदिरानगर, रामनगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, रुपादेवी, येऊर, डिफेन्स, विठ्ठल क्रिडा मंडळ, किसननगर भागात पाणी पुरवठा बंद राहिल. तसेच शहरातील उर्वरित भागात कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु राहील. यामुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading